Loading...

कथा आत्महत्या केलेला पहिला मराठी शेतकऱ्यांची - साहेबराव करपे आणि ६ जणांचा परिवार !

नक्की वेळ काढुन वाचा...
साहेबराव करपेंच्या सहकुटुंब
आत्महत्येमागील वास्तव*




हि गोष्ट आहे ३२ वर्षांपूर्वीची जेव्हा घडली महाराष्ट्रातील पहिल्या शेतकऱ्याची आत्महत्या १

यवतमाळ जिल्ह्यातील तालुका महागाव चिलगव्हाण गावी साहेबराव पाटील करपे यांनी पत्नी व चार मुलांसह
वर्ध्यातील दत्तपूर  येथील मनोहर कुष्ठधामात आत्महत्या केली होती सामूहिक आत्महत्या. राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. मार्च महिन्यामध्ये ह्या घटनेला ३२ वर्ष पूर्ण झाले पण शेतकरी आत्महत्येचा राक्षस काही महाराष्ट्रातून हटायला तयार नाही उलट तो वाढतच चालला आहे आणि फोफावतो आहे.

४० एकर शेतीचा मालक असलेला साहेबराव आत्महत्येच्या निर्णयाप्रत का आले?, या प्रश्‍नाने त्यावेळी सर्वांना अस्वस्थ करून सोडले होते.
माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आत्महत्येपासून बोध घेत सरकार शेतकऱ्यांसाठी काहीतरी करेल, असा आशावाद साहेबराव करपे यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत नोंदवला होता.

त्यांची ती आर्तता आजपण कुठल्याही सरकारने पूर्ण केली नाही पण आपल्या नाकर्ते पणामुळे शेतकरी अजून पण आत्महत्येच्या गर्त्यातच फसत चालला आहे. 
संगीत विशारद असलेले, उत्तम भजन गाणारे आणि चिलगव्हाणचे ११ वर्षे सरपंच राहिलेले, साहेबराव करपे हे तसे जुने प्रस्त, गावात मोठा वाडा; पण भग्नावस्थेत. वाड्यातच त्यांचे कुटुंब राहात होते. थकीत बिलापोटी एमएसईबीने वीजजोडणी खंडित केली. ४० पैकी १५ एकरांतील पोटऱ्यांपर्यंत आलेला गहू-चना वाळला अन्‌ सोबतच साहेबरावांची स्वप्नेही करपलीत. डोक्यावर असलेल्या कर्ज फेडण्याच्या चिंतेने ते सैरभैर झाले. मनाने खचले. दोघंही पती-पत्नीने काहीतरी मनाशी ठरवले व मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडले.*



करपे पाटील नेहमी वर्ध्यातील मनोहर कुष्ठधामात यायचे. १९ मार्च १९८६ रोजीही ते पत्नी व चार मुलांसह कुष्ठधामात आले, तिथे खोली घेतली. खोलीतच टाळ, हार्मोनियमच्या साथीने भजने गायली आणि परमेश्वराचे स्मरण केले . सोबत आणलेल्या स्टोव्हवर पत्नीने सर्वांसाठी भजी केलीत, कठोर मनाने त्यात विष मिसळले. पहिले मुलांना भजे खायला दिले. एक-एक करीत चारही मुलांनी व पाठोपाठ पत्नीने ही जगाचा दुर्दैवी निरोप घेतला. यानंतर साहेबराव यांनी शेतकऱ्यांच्या हलाखीच्या स्थितीचे वर्णन करणारी चिठ्ठी लिहिली. त्यात त्यांनी हा निर्णय का घेतला, याविषयी सविस्तर लिहिले. तसेच दोन मुले, दोन मुली (लहान मुलगी सात-आठ महिन्यांचीच होती) व पत्नीच्या मृत्यूचा घटनाक्रमही लिहिला. खोलीत एका रांगेत पत्नी आणि मुलांचे मृतदेह ठेवून त्यांच्या कपाळावर त्यांनी एक-एक रुपयाचे नाणे ठेवले. इतका टोकाचा निर्णय घेतानाही या प्रकरणात कुणी अकारण अडकू नये, याचे भान साहेबराव करपे यांनी ठेवले. दाराबाहेर दगडाला दोरीने बांधून फेकलेल्या चिठ्ठीच्या वरच्या भागातच त्यांनी कुणीही दार उघडू नये, पोलिसांना कळवावे, असे लिहून ठेवले होते. नंतर विष मिसळलेले भजे खाऊन त्यांनीही तडफडत मृत्यूला कवटाळले. महाराष्ट्राच्या खोट्या अभिमानाला काळिमा फासणारा अत्यंत दुर्दैवी निर्णय महाराष्ट्राच्या भूमिपुत्रानेच घेतला होता.

तिथे साहेबरावांचे वृद्ध आणि पायाने अधू वडील, गावातील चारपाच लोक आले त्यांनी पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण केली. महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. निगरगट्ट प्रशासन मात्र तेव्हा पण तसेच होते आज पण तसेच आहे. शेतकरी आत्महत्या चालूच आहे. कोणालाही मायेचा पाझर फुटेना. आता परमेश्वर पण मनाने हारला असेल